THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday 31 January 2017

Saturday 28 January 2017

मी मेल्यावर*      

तिरडीवर फुलांबरोबर थोडं तांदूळही टाका                                                 पांढ-या कापडावर तांदूळाच्या प्रमाणाचे आकडे टाका
गळ्यात घाला माझ्या भाजीपाल्याच्या माळा                                                     या सगळ्याशिवाय जुळणार नाय MDMचा ताळा       ||१||
मी मेल्यावर..................................    
खांदेकरी म्हणून चार शिक्षकच निवडा
उशाखाली ठेवा तांदूळाच्या पोत्यांचा बिंडा
खोबर्याबरोबर सरणात एक सिमकार्डपण टाका
ठरलेच माहिती भरायचे तर नको रेंज चा धोका  ||२||
मी मेल्यावर    .......................

सावडताना वाळू ऐवजी तांदूळाची पिंड करा
फुलांबरोबर वहायला ठेवा चवळी मटकी हरभरा
आवडीचा पदार्थ म्हणून ठेवा राजगिरा लाडू
शिवलाच जर कावळा तर लागायला नको कडू //3//                                मी मेल्यावर..........................          
दहाव्याला जेवणात खिचडी भात करा
गिळायला सोपा आणि पचायला ही बरा
जोडीला वाटाण्याची आमटीही करा            चवीला थोडंसं मीठ अन् हरभरा /4/                                                मी मेल्यावर........................            
वर्षश्राध्द मात्र माझं धुमधडाक्याने करा
तालुक्याला जेवण अन् जिल्ह्यात बोजबारा
मरणाची माझ्या मोठी जाहिरात करा        *MDMनव्हतं जमत पण शिकवाय होता बरा*  ...
*MDM नव्हतं जमत पण शिक्षक होता बरा...*
                                      ब्राझील म्हटले कि लगेच फुटबॉल आठवतो.पेले,रोनाल्डो सारखे  आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे या देशाने जगाला दिलेली देणगीच.पण आज ब्राझील ची एक वेगळी ओळख जगासमोर आली आहे.एप्रिल  २०१६ मध्ये या देशाने माध्यमिक स्तरावरील सर्वच बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे उद्दिष्ट गाठणारा जगातील पहिला देश हा बहुमान मिळवला आहे.संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच प्रकशित केलेल्या अहवालात या प्रयोगाची विशेष दखल घेतली गेली आहे. याच प्रयोगाची ओळख करून देणारा हा लेख.
                                      सेंट लुईस हा अमेझॉन च्या खोऱ्यात वसलेल्या खेड्यात राहणारा मुलगा.गावात एकूण २० कुटुंबे अन लोकसंख्या ७६.लुईस अन त्याचा मित्र फर्नांडीस  हे दोघे यावर्षी ११ वी मध्ये शिकत आहे.त्यांच्या गावातील हे दोघेच  उच्च शिक्षित युवक.10 वर्षापूर्वी ची परिस्थिती मात्र वेगळी होती.माध्यमिक शिक्षण घ्यायचे असेल तर लुईस समोर दोनच पर्याय होते.एक म्हणजे १०० मैल दूर असणाऱ्या शहरात जाणे—जिथे पोहचायला तब्बल २ आठवडे लागतात,किंवा मग शिक्षण सोडून देणे.माध्यमिक स्तरावर होणारी गळती हा ब्राझील च्या सरकार समोरचा चिंतेचा प्रश्न होता.ही गळती रोखण्यासाठी सरकारने अंमलात आणलेला कृती  आराखडा म्हणजेच ‘तंत्रस्नेही शिक्षणाचा ब्राझिलियन  प्रयोग’.
                                      सन २००९ साली आपला  भारत देश १४ वर्षाखालील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा कायदा केला म्हणून आनंदोत्सव साजरा करत होता , त्याच वर्षी ब्राझील ने माध्यमिक स्तरावरील मुलांना  गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा कायदा केला अन याची  उदिष्टे गाठण्याची कालमर्यादा सन २०१६ अशी ठरवण्यात आली.ब्राझील च्या कायद्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण हा मुलभूत घटक मनाला गेला.तसेच निश्चित कालमर्यादेत हे उदिष्ट साध्य करावयाचे असल्याने विचार व कृती यांमध्ये एकवाक्यता साधली गेली. अमेझॉन च्या खोऱ्यात वसलेल्या २३०० खेड्यातील तब्बल ३,००,००० मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यात ब्राझील ला यश आले आहे.माध्यमिक स्तरावर होणाऱ्या गळती मागील महत्वाचे कारण होते – माध्यमिक स्तरावरील शिक्षणासाठी करावा लागणारा शेकडो मैलांचा प्रवास.यावर उपाय म्हणून ही मुले ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होती त्याच शाळेत माध्यमिक शिक्षणासाठी थेट प्रक्षेपण केंद्रे उभारण्यात आली.सरकारी मालकीची दूरचित्रवाहिनी ,उपग्रह सेवा पुरवठादार  व स्थानिक केबल चालक यांच्या मदतीने पहिल्या टप्प्यात  तब्बल २३०० खेड्यामधील शाळेत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.केवळ पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर हा देश थांबला नाही तर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण देण्याच्या यापूर्वीच्या अयशस्वी प्रयोगांवर मात कारणासाठी विशिष्ट कार्ययोजना आखली गेली.ब्राझील मधील विख्यात शिक्षणतज्ञ,बालमानसशास्त्रज्ञ व शिक्षण शास्त्र अभ्यासक यांच्या मदतीने असे शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम तयार केला गेला.या मुलांची भौगोलिक परिस्थिती,परंपरा,बोलीभाषा,पालकांचे व्यवसाय यांच्या  अभ्यासातून  व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करत   शिक्षणातून अर्थार्जन हे उदिष्ट साध्य करणारा अभ्यासकम आखला गेला. कौशल्याधीष्ठीत  अभ्यासक्रमाच्या आखणी नंतर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी ब्राझील मधील सर्वोत्कृष्ट ५० शिक्षकांची निवड केली गेली. अमेझॉन ची राजधानी मानौस मधील केंद्रातून हे शिक्षक रोज ४ तास अध्यापन करत राहिले. हे थेट प्रक्षेपण ज्या शाळेत दाखवले जात होते त्या शाळेतील शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन (Classroom-Management ) व  मूल्यमापनाचे (Evaluation) चे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.थेट प्रक्षेपण वर्ग रटाळ न होता अधिक परिणामकारक होण्यासाठी द्विमार्गी संवादाची सुविधा देखील पुरवण्यात आली.यामुळे कोणताही विद्यार्थी त्याला आलेली अडचण तज्ञ मार्गदर्शकाना विचारू शकत होता.त्यामुळेच हे अध्यापन अधिक प्रभावी ठरले.पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या मुल्यमापनाला फाटा देत कौशल्याधारित मुल्यमापनाचा  अवलंब करण्यात आला.मुलांचे मूल्यमापन हे सार्वत्रिक न करता ते वैयक्तिक करण्यात आले.त्यामुळे प्रत्येक मुलाच्या प्रगतीच्या आलेखाची तुलना इतरांशी होण्याचा धोका टाळला गेला. प्रत्येक आठवडा अखेर या प्रत्येक मुलाच्या आठवड्यातील कामगिरीचा आढावा घेवून पुढील आठवड्यातील पाठ्य्क्रमाची आखणी केली गेली.  प्रत्येक शाळेला पुढील आठवड्याचे वेळापत्रक अगोदरच पाठवले जाई त्यामुळे तेथील शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन करणे अधिक सुलभ जाई.
                                         सलग ३ वर्षे याची अंमलबजावणी केल्यानंतर याची उपयुक्तता पाहून ब्राझील मधील इतर ६ राज्यांनी देखील याच मॉडेलचा स्वीकार केला.मागील 10 वर्षे हा प्रयोग सुरळीत सुरु आहे.याचाच पर

भारतीय समाजमन

                     ‘15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला’;इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील  या विधानाची सत्यताच प्रश्नांकित व्हावी असे सामाजिक वर्तन मागील काही वर्षात  दिसून येत आहे. हा देश स्वतंत्र झाला कि निव्वळ राजकीय , आर्थिक व न्यायिक बाबतीत सत्तांतर घडून आले ? असा प्रश्न मनात येतो.सत्तांतर म्हणण्यामागे या क्षेत्रातील इंग्रजाळलेली विचारधारा आहे. राजकीयदृष्ट्या निर्णय घेताना आजही इंग्रज राजवटीतील प्रक्रिया अवलंबली जात आहे.प्रशासनात जबाबदारीचे तत्व लागू करण्यात आपण अयशस्वी ठरत आहोत.आजही आपली न्यायव्यवस्था आंधळी बनून राहिली आहे.ज्या न्याय व्यवस्थेने जनरल डायर ला जालियानवाला बाग हत्याकांडातून निर्दोष मुक्त केले ,तीच न्यायव्यवस्था सलमान खान ला देखील निर्दोष मुक्त करते. कायद्यासमोर सर्वजण समान असतात;काहीजण अधिक समान असतात.या विधानाची प्रचिती आजही वारंवार येतच राहते.भारतीयत्वाचा ठसा असणारी  डोळस न्यायव्यवस्था आपण निर्माण करू शकलो नाही.न्याय देवता आंधळी असणे हे इंग्रजांचा फायद्याचे होते ;भारतीयांच्या नव्हे.इंग्रजांचे अंधानुकरण व अनुकरणप्रीयता हा आपला स्थायीभाव देशहिताला घातक ठरतोय.
                    जी बाब धोरणकर्त्यांची तीच आपल्या नागरिकांची.  स्वतंत्र देशातील नागरिकांप्रमाणे भारतीय नागरिक कोणत्याही  घटनेला प्रतिसाद देत नाहीत हे वारंवार दिसून येत आहे.इंग्रज कालावधीतील भारतीय नागरिकांचे वर्तन व सध्यस्थितील वर्तन यांमध्ये  खूपच साम्य आढळते. इंग्रज कालावधीत सरकारी व्यवस्था खीळखिळी करण्याकडे आंदोलनकर्त्या  भारतीय नागरिकांचा कल असायचा.आजही आपण सरकारी यंत्रणेला जेरीस आणून मागणी मान्य करण्याकडेच  अधिक वेळा झुकतो. ही मागणी मान्य करून घेत असताना त्या विशिष्ट समुदायामध्ये देखील  दोन विचारप्रवाह प्रकर्षाने जाणवतात.ते म्हणजे मवाळ  व जहाल विचार प्रवाह.प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या प्रारंभिक स्थितीत हा मवाळ  गट प्रभावी राहतो. अर्ज,निवेदने,उपोषण या मार्गाने या मवाळ गटाचे प्रयत्न सुरु असतात.या कालावधीत जहाल विचारसरणीचे  लोक काहीसे सुप्तावस्थेत राहतात . मात्र मवाळ गटाच्या प्रयत्नांना प्रशासनाचाही मवाळ प्रतिसाद पाहून मग हा जहाल गट अधिकच सक्रीय होतो अन जाळपोळ,बंद,दंगल अशा मार्गांचा अवलंब करून आपली मागणी पुढे रेटण्याचा आक्रमक प्रयत्न करतो.आश्चर्याची  बाब अशी कि भारतीय प्रशासन देखील या जहाल विचारसरणीला तात्काळ प्रतिसाद देते.पुढे जाऊन हा प्रश्न सुटलाच तर मग जहाल विचारांनीच प्रश्न सुटतो हा संदेश समाजात जातो.याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जाट समुदायाचे आंदोलन.जाट समुदायाच्या आरक्षण संदर्भातील  आंदोलनाचा प्रवास देखील याच दिशेने सुरु आहे.आपल्या स्वातंत्र्य लढ्याकडे ही नजर टाकली तर हीच पद्धत अवलंबल्याचे दिसून येते.स्वातंत्र्य मिळवण्याचा अखेरचा हल्ला म्हणूनच ‘चले जाव’ चा एल्गार महात्मा गांधीजीनी पुकारला होता.

                        मात्र जहाल विचारसरणीचा गट हा देश  स्वतंत्र आहे  हेच विसरतो असे वाटते. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सार्वजनिक मालमत्तेची हानी करताना देखील जहाल गट सिलेक्टिव्ह होता.इंग्रज सरकारच्या मोक्याच्या ठिकाणांना ते लक्ष करत असत.जेणेकरून भारतीय नागरिक वा इंग्रज सेवेतील भारतीयांना त्रास होवू नये.त्यावेळी  राष्ट्र भावना अधिक प्रबळ होती.इंग्रज कालखंडात भारतीय नागरिकांनी बहिष्कार घातला  तो इंग्रजांच्या विदेशी कपड्यांवरच. मात्र आजही आपण आपल्याच सरकारी मालमत्तांचे नुकसान करत राहतो.एसटी गाड्यांच्या काचा फोडताना या आपल्याच देशाच्या गाड्या आहेत व या आपल्याच सोईसाठी आहेत हे विसरूनच आपण उग्र वर्तन करतो. आपण राष्ट्रभावना  विसरत चाललो आहोत असे वाटते. जाट समुदायासारख्या  उग्र आंदोलनाने आपण आपल्याच पायावर दगड मारून घेत आहोत.भारतासारख्या विकसनशील देशाचे विकसित देशात रुपांतर न  होण्यास आपले वर्तन कारणीभूत ठरतेय का? याचा विचार  करूया. या देशाच्या प्रगती मधील अडथळे आपणच आहोत. आपले जनजीवन विस्कळीत करण्याचे काम आपणच करत आहोत.आपल्यातील भारतीयपणा हरवत आहे असे वाटते.जाट समुदायाच्या आंदोलनकर्त्यांनी दिल्लीकरांचे पाणी अडवणे ही कृती याच मानसिकतेचे दर्शक आहे.अन हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी लष्कराला यावे लागणे ही तर त्याहून मोठी  शोकांतिका  मानावी लागेल. शत्रू  सैन्यावर गोळीबार करत  सीमेचे रक्षण करण्याऐवजी आपल्याच देशातील नागरिकांवर गोळीबार करण्याची वेळ लष्करावर यावी हे आपल्या  राजकीय यंत्रणेचे अपयश आहे. जगातील किती देशातील लष्कराला आपल्याच देशातील नागरिकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले जात असावेत ? याचा विचार राज्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे.आपली मागणी मान्य करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करताना  आपण निरपराध  भारतीय नागरिकांचा बळी   का घेतो  ? या कृत

QR coded Text Books

 पिचाई यांसारखे कित्येक भारतीय नागरिक अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.तंत्रज्ञान क्षेत्रात आपण आघाडीवर असलो तरी हे तंत्रज्ञान  भारताच्या ग्रामीण भागात मात्र कासव गतीने मार्गक्रमण करत आहे.याला पायाभूत सुविधांची अनुपलब्धता कारणीभूत  असो वा नागरिकांची अनास्था.मात्र या दोन्ही समस्यांवर मात करत ‘power to empower ’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवत ‘डिजिटल इंडिया ‘ ची घोषणा करण्यात आली.अनेक खाजगी संस्था नानाविध सुविधा त्यांच्या ग्राहकांना तंत्रज्ञानाच्या  सहायाने पुरवत असताना सरकारने देखील मागे न राहण्याचे ठरवले असावे.आज महाराष्ट्र सरकारने देखील जवळपास 150 सेवा online पद्धतीने पुरवण्यास सुरवात केली आहे.या डिजिटल इंडिया मधील डिजिटल नागरिकांना घडवण्याचे कार्य ज्या वर्ग खोल्यांमध्ये चालते तिथेदेखील तंत्रज्ञान वापरास सुरवात झाली आहे.अनिल सोनुने,बालाजी जाधव सारखे शिक्षक या डिजिटल चळवळी चे नेतृत्व खंबीरपणे सांभाळत आहेत.आजही वर्गखोल्यामध्ये पाठ्यपुस्तक हेच शैक्षणिक साधन प्रभावीपणे वापरण्यास शिक्षक उत्सुक दिसतात.मात्र या पाठ्यपुस्तकांना तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचे आव्हान बालभारती समोर आहे.शिक्षण मंत्र्यांनी देखील बालभारती ला ‘e-बालभारती’ चे स्वरूप देण्याचा मनोदय सदैव बोलून दाखवला आहे.तंत्रज्ञान वापराने अंकीय दरी ( digital divide ) कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान अधिक सुलभरीत्या ग्रामीण भागात पोहचवणे आवश्यक ठरते. ‘e-बालभारती’ च्या प्रयोगातून ही दरी कमी करता येणे शक्य आहे.कारण पाठ्यपुस्तके प्रत्येक मुलापर्यंत सहजरीत्या पोहचतात.पाठ्यपुस्तके तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम केली तर तंत्रज्ञान वापरास उत्सुक नागरिक प्राथमिक स्तरातुनच तयार होतील.मोबाईल च्या माध्यमातून पाठ्यपुस्तकांना ‘e-बालभारती’ चे स्वरूप देत डिजिटल नागरिक घडवणाऱ्या अशाच  एका  यशस्वी प्रयोगाबद्दल आज जाणून घेवूयात.सोलापूर च्या जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी हा प्रयोग जून 2015 पासून राबवला आहे.QR चा पाठ्यपुस्तकात वापर करणारा हा प्रयोग.QR कोड म्हणजे Quick Responce code. मुख्यतः व्यापारी क्षेत्रात याचा वापर केला जातो.या कोड मध्ये सांकेतिक रुपात साठवलेली माहिती मोबाईल द्वारे काही क्षणात प्राप्त करता येते.मात्र या कोडचा शिक्षण क्षेत्रात  कल्पकपणे वापर रणजीतने केला.पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठासाठी  त्यांनी हे QR कोड तयार केले.या कोड मध्ये संबंधित पानांवरील आशय अंकीय स्वरुपात ( Digital content ) साठवला . या कोड मध्ये साधारणपणे  खालील घटक सामाविष्ट आहेत.
·         अभ्यासविषयक सूचनाचा संच,
·         बालकाने करावयाच्या कृती संच
·         कविता असेल तर MP३ format
·         गोष्टी साठी व्हिडीओ
·         online प्रश्नपत्रिका
·   संबंधित पानांवर चिटकवले.मोबाईल मधील NEO Reader या app च्या सहाय्याने हा QR  कोड स्कॅन केला कि त्या पानावरील कविता ऑडीओ रुपात ऐकायला मिळते, पाठाचा विडीओ  पाहता येतो. विडीओ पाहून झाला कि लगेच online प्रश्नपत्रिका मोबाईल वर झळकू लागते.ही प्रश्नपत्रिका सोडवली असता त्याचा निकाल मुलाच्या इ-मेल वर तात्काळ प्राप्त होतो.प्रत्येक मुलाला त्याच्या गतीने ,कधीही ,कुठेही शिकण्याची संधी यामुळे मिळत आहे.एखादा घटक मुलाला समजला नाही तर तो पुन्हा कोड स्कॅन करून शिकू शकतो.या कोड मध्ये त्यांनी online feedback  देण्याची देखील सोय केली असून काही अडचण आली तर हेल्पलाईन देखील सुरु ठेवली आहे.पाठ्यपुस्तकातील आशय जिवंत करण्याची किमया या तंत्राने साध्य झाली असून आज महाराष्ट्रातील 7427  जि.प.शाळांमधील जवळपास 1,50,000 मुले ही QR कोडेड बुक्स वापरत आहेत.मोबाईल चा शैक्षणिक वापर करण्यास प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प तंत्रस्नेही नागरिक घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.या तंत्रज्ञानाची व्यापकता वाढण्याचे कारण म्हणजे त्याची सुलभता.

Sunday 22 January 2017

1st standard basics

देशभक्ती पर मराठी हिंदी गाणे mp3

देशभक्ती पर मराठी हिंदी गाणे mp3

देशभक्ती पर मराठी हिंदी गाणे mp3 मध्ये .हव्या त्या गाण्यावर 
क्लिक करा आणि गाणे डाउनलोड करा !






Saturday 21 January 2017

प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन
* Happy Republic Day
सर्वांना 68 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....


*प्रजासत्ताक दिन भाषण26 जानेवारी भाषणे..
* प्रजासत्ताक दिन माहिती ( मराठी )प्रजासत्ताक दिन
*प्रजासत्ताक दिन माहिती ( हिंदी )गणतन्त्र दिवस
* प्रजासत्ताक दिन माहिती ( English )Republic_Day_(India)
*आदर्श ध्वजसंहिता pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठीध्वज संहिता
* विविध देशभक्ती गीते mp3DESHBHAKTI SONGS

Wednesday 18 January 2017

● क्रीडा

● क्रीडा


शासन निर्णय
सूचना : खालील नमूद शासन निर्णयाच्या प्रती डाऊनलोड करुन घेण्यासाठी त्या-त्या शासन निर्णयाच्या विषयावर क्लिक करावे.

.क्र.
शासन निर्णयाचा विषय
शासन निर्णय दिनांक
१.
२१.०४.२०१५
२.
२२.०१.२०१५
३.
१३.०२.२०१५


४.
०१.१०.२०१२
५.
२८.०४.२०१४



 विना अनुदानित खेळांची यादी 

अ.क्र
खेळ
अ.क्र
खेळ
अ.क्र
खेळ
बुडो मार्शल आर्ट
२०
फ़ुटबॉल टेनिस
३९
स्क्वॅश
.अष्टेडू आखाडा
२१
जंपरोप
४०
टेनिक्वाईट
मॉन्टेक्स बॉल क्रिकेट
२२
कराटे
४१
टेनिस बॉल क्रीकेट
चॉकबॉल
२३
क्याकिंग व कनोईंग
४२
टेनिस व्हॅलीबॉल
लंगडी
२४
कीक बॉक्सींग
४३
थांग-ता
म्युझिकल चेअर
२५
कुडो
४४
ट्रॅडिशनल कुस्ती
स्पोर्टस  डान्स
२६
नेट बॉल
४५
रस्सीखेच
टॅंग सु डो
२७
पिकलबॉल
४६
वुशू
हाफ़ किडो बॉक्सिंग
२८
पॉवर लिफ़टींग
४७
वुडबॉल
१०
लगोर
२९
रोल बॉल
४८
योगा
११
पेन्ट्याक्यू
३०
रोलर स्केटिंग
१२
कुराश
३१
रोलर हॉकी
१३
रग्बी
३२
रोप स्किपींग
१४
स्पीडबॉल
३३
सेलिंग
१५
बेसबॉल
३४
सेपक टकरा
१६
चायक्वांदो
३५
शुटींग बॉल
१७
सायक्लींग
३६
स्क्वॅय
१८
डॉजबॉल
३७
सिलंबम
१९
फ़िल्ड आर्चरी
३८
सॉफ़्ट टेनिस


 विविध खेळ व त्यांची माहिती

Monday 16 January 2017

WordPress Blog Banane Jankari Setp by Step

WordPress Blog Banane Jankari Setp by Step

वर्डप्रेस पर फ्री ब्लॉग बनाने के लिए आप यहाँ क्लीक करके wordpress.com पर जाए.


start a blog
start a blog

वर्डप्रेस की साईट ओपन होने के बाद आपके सामने 3 ओप्संस आयेंगे जो की इस तरह होंगे. Create a Website, Start a Blog, Discover. हम अपने इस आर्टिकल के द्वारा फ्री का ब्लॉग बनाना सिख रहे है. तो हम Start a Blog पर क्लीक करेंगे.


Get Started
Get Started

Start a Blog पर क्लीक करने के बाद आपके सामने Create a Free Blog का ओप्संस आयेंगा. इसमें आपको Get Started पर क्लीक करना है.
Get Started पर क्लीक करते ही आपके सामने एक और पेज ओपन होगा. जिसमे आपको पूछा जायेगा. आप किस Subject पर अपना ब्लॉग बनाना चाहते हो. अपने Subject को सलेक्ट करे.
Subject सलेक्ट करने के बाद नेक्स्ट पेज पर आपको Category को सलेक्ट करना है. आप अपनी पसंद की Category को सलेक्ट कर सकते है. आप चाहे तो Special Education भी सलेक्ट कर सकते . 
केटेगरी सलेक्ट करने के बाद अब आपके सामने Theme का ओप्संस आएगा. जिसमे आपको बहुत सी थीम मिलती है. आप अपनी पसंद के अनुसार किसी भी Theme को सलेक्ट कर ले.


wordpress domain
wordpress domain

Theme सलेक्ट करने के बाद आपके सामने Domain Name का ओप्संस आएगा. यहाँ आपको वो नाम लिखना है जिस नाम का आप ब्लॉग बनाना चाहते है. ध्यान रहे हम यहाँ फ्री ब्लॉग बनाना सिख रहे है. तो आपको यहाँ Free वाले ओप्संस को सलेक्ट करना है. जो नाम आप लिखोगे तो आपकी पसंद के नाम के आगे wordpress.com भी लिखा आएगा. आप चाहे तो अपनी पसंद का Domain Name खरीद भी सकते है.


wordpress free plan
wordpress free plan

Domain Name सलेक्ट कारने के बाद आपको Next पेज पर 4 तरह के प्लान दिखाई देते है. पहला फ्री प्लान है. और बाकी के 3 Paid Plan है. तो Free Plan को सलेक्ट करते है.


wordpress create account
wordpress create account

Free Plan सलेक्ट करने के बाद Next Page पर आपको Create you account का पेज मिलेंगा. जिसमे आपको अपना Email Address, Blog का Username, और ब्लॉग का Password Submit करना है. सभी डिटेल भरने के बाद Create My account पर क्लीक कर दे.
Create My Account पर क्लीक करते ही आपका WordPress Blog बन कर तैयार हो जाएगा. अब बस आपको इसे एक्टिव करना है. आपके सामने Confirm Email Address का एक ओप्संस आएगा. आप अपनी ईमेल आईडी लॉग इन करे. वह आपको वर्डप्रेस की तरफ से एक ईमेल आया होगा. उसे ओपन करके Confirm Email Address पर क्लीक कर दे. एसा करते ही आपका वर्डप्रेस ब्लॉग एक्टिव हो जाएगा.
बस आपको इतना ही करना था. अब आपके पास भी WordPress का फ्री का ब्लॉग है. अब आप ब्लोगिंग करने के लिए पूरी तरह तैयार है. आज मैंने आपको फ्री ब्लॉग बनाने की जानकारी दी है जल्दी ही आपको WordPress  Hosting के द्वारा एक website Create करना बताऊंगा.